Now Playing
जांभुळणी येथे वन विभागाच्या जमिनीवरती आग लागून 100 हेक्टर वनसंपदा जळून खाक अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा बद्दल नागरिकांमधू
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
जांभुळणी येथे वन विभागाच्या जमिनीवरती आग लागून 100 हेक्टर वनसंपदा जळून खाक अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा बद्दल नागरिकांमधू
डिप्टी जेलर बनी मानसी सिंह का सीएचसी अमेठी में डॉक्टर सौरभ सिंह धीरज सिंह फार्मासिस्ट जितेंद्र सिंह एनमने किया सम्मानित
मथुरागौमातासेवकसूबेदारमेजर ब्रज वीरसिंह शैलेन्द्र पहलवानजग्गाभाईउनकीटीम द्वारा सिटी मजिस्ट्रेट साहब को ज्ञापन सौंपा
पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला होता,अभियान प्रमुख संजयकुमार कांबळे
ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी व एक पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
MANT-हनुमान जयंती पर झाड़ी वाले हनुमान मंदिर में उमड़ा आस्था का सैलाब, दर्शन को लगी भक्तों की लंबी कतारें”
MANT-मथुरा के कोसीकलां में फैक्ट्री में लगी भीषण आग, दमकल की कई गाड़ियां मौके पर,,
आगरा जमीन विवाद से परेशान दिव्यांग ने खाया जहर, वीडियो बना कर दी थी चेतावनी न्याय नहीं मिलने का लगाया आरोप
संध्या कोचिंग सेंटर गोरियाअंबा के छात्र सचिन ने बिहार मेट्रिक बोर्ड परीक्षा में 448 अंक प्राप्त कर संस्थान का बढ़ाया मान
संदिग्ध परिस्थितियों में प्रेम विवाह के बाद विवाहिता की हुई मौत, परिजन लगा रहे हत्या का आरोप ,पुलिस जांच में जुटी
▶️.....यूपी के जिला मिर्जापुर में BJP विधायक रत्नाकर मिश्रा ने 15 दिन पहले जिस पैंटून (पीपा) पुल का उदघाटन किया था, वो क्षतिग्रस्त हो गया। ये पुल हरसिंहपुर और विंध्याचल धाम को जोड़ता है*
Comments (1)
Ashok Pawar MD
20 Apr, 2025जांभुळणी येथे वन विभागाच्या जमिनीवरती आग लागून 100 हेक्टर वनसंपदा जळून खाक अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमधून संताप आटपाडी तालुक्यातील जांभुळणी गावाच्या हद्दीत असलेल्या वन जमिनीवर शनिवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास आग लागून वन जमीन व खाजगी जमीन अशी जवळपास 100 हेक्टर जमिनीवरील वनसंपदा जळून खाक झाली आहे सदर जमिनीची देखभाल करणारी शासकीय यंत्रणा वेळेत पोहोचली नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे जांभुळणी गावाच्या पूर्वेस असलेल्या वन विभागाच्या जमिनीमध्ये शनिवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास आग लागली ची घटना निदर्शनास आल्यानंतर येथील स्थानिक नागरिकांनी वन विभागाला फोन करून माहिती देण्याचा प्रयत्न केला परंतु वन विभागाचे वनपाल वनक्षेत्रपाल यांचे फोन उचलले जात नव्हते तोपर्यंत स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु सदरची आग ही इतकी भयानक होती की या ठिकाणी लागलेली आग खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा पसरली रात्री उशिरापर्यंत आगीचे लोट पाहायला मिळत होते मात्र इतकी मोठी आपत्ती असताना सुद्धा वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी कोणीही इकडे फिरकले नाहीत असा स्थानिक नागरिकांनी आरोप केलेला आहे जेव्हा सुरुवातीला आग लागल्याचे निदर्शनास आलं तेव्हा नागरिकांनी आटपाडीचे वनक्षेत्रपाल यांना माहिती देण्यासाठी फोन केले परंतु फोन उचलला नाही शेवटी जिल्हा वनक्षेत्रपाल यांना माहिती दिली परंतु तेथूनही पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे आग मोठ्या प्रमाणामध्ये पसरली आणि यादीमध्ये हजारो वृक्ष जळून खाक झाले त्याचबरोबर या वन जमिनीमध्ये असलेले वन्यजीव जीवसृष्टी जळून खाक झाली आहे रात्री उशिरा वन विभागाचे कर्मचारी म्हणून दोन वनमजूर व रोजंदारीवरील दोन कर्मचारी चार जण घटनास्थळी पोचले पण आजीचं रुद्र रूप इतकं मोठं होतं की ही एवढी कुमक पुरेशी नव्हती त्यामुळे स्थानिक नागरिकांतून वन विभागाच्या या भोंगळ कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे वन रक्षणासाठी शासनाकडून भला मोठा पगार देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे मात्र वनांची सुरक्षा करण्यासाठी या लोकांकडून टाळाटाळ केली जाते तर यांना पगार का दिला जातो असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे सदर घटनेबाबत दोशी कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे