Now Playing
जिल्हा अधिकारी कोर्टातील केसेस आटपाडी मध्येच चालवाव्यात शेतकरी संघटनेची मागणी, आयुक्तांची मान्यता
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
जिल्हा अधिकारी कोर्टातील केसेस आटपाडी मध्येच चालवाव्यात शेतकरी संघटनेची मागणी, आयुक्तांची मान्यता
आटपाडीत हिंदू-मुस्लिम सामाजिक एकतेचं दर्शन
महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करताना
शिवस्फारकासाठी आटपाडी मध्ये बंद आंदोलकांकडून घोषणाबाजी
शिवस्मारकाच्या साठी आटपाडीकरांचा कडकडीत बंद आटपाडीकरांच्या प्रतिसाद उस्फूर्त महेश कुमार पाटील
चामोर्शी तालुका पारंपारिक महाग्रामसभेची मासिक सभा उत्साहात संपन्न
रेणापूर शहरात शासकीय रुग्णालयासमोर ट्रकने चौघांना चिरडले,दोघे ठार तर दोघे गंभीर जखमी
लाखोंचे कर्ज,टँकरने पाणी,टोमॅटोला कवडीमोल भाव,शेतकरी हताश
लखमापूर बोरी जि,प, उच्च,प्रा, केंद्र शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न
वायगाव येथे कॉन्ट्रॅक्टरने गळफास घेऊन केली आत्महत्या
हंडरगुळी शिवारात शेतकऱ्यांची आत्महत्या,तिघांवर वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Comments (1)
Ashok Pawar MD
19 Jul, 2025जिल्हा अधिकारी कोर्टातील केसेस आटपाडी मध्येच चालवाव्यात शेतकरी संघटनेची मागणी आयुक्तांची मान्यता शेतकरी संघटनेचे विधानसभा अध्यक्ष एडवोकेट गणेश जोगदर व शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष शिवाजी नंदखेळे यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे महसुल विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्या केसेस जिल्हाधिकारी यांच्यासमोर आहेत त्या केसेस महिन्यातून एक दिवस जिल्हाधिकारी यांनी आटपाडी मध्ये येऊन चालवाव्यात मागणी करण्यात आली आहे या निवेदनामध्ये म्हटलं आहे की आटपाडी तालुका हा सांगली पासून जवळपास 125 किलोमीटर इतका दूर आहे शेतकऱ्यांना आटपाडी पासून सांगली पर्यंत जाण्यासाठी जवळपास तीन तास एवढा वेळ जातो व या केसेस बारा नंतर सुरू होतात त्यामुळे परत येताना शेतकऱ्यांना रात्री दहा वाजता त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो शिवाय येण्या-जाण्याचा खर्चही होतो त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी खूप त्रास सोसावा लागतो शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी कमीत कमी महिन्यातून एक वेळा आटपाडीमध्येच केसेस चालवाव्यात अशी मागणी पुणे महसूल विभागीय आयुक्त यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे यावर महसूल आयुक्त यांनी अर्जदार यांना सांगितलं की सदरची मागणी आम्हालाही मान्य आहे आम्ही अशाच पद्धतीने काम करण्याचा विचार करत होतो आम्ही तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत आहोत असे आश्वासन अर्जदार यांना दिले आहे त्यामुळे येत्या काळामध्ये नागरिकांचे न्याय मिळवण्यासाठी चे सांगलीचे हेलपाटे कमी होणार आहेत व न्याय कमी पैशात व कमी कष्टात मिळेल अशी आशा करायला हरकत नाही