Now Playing
शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांचा आज बुधगावात मेळावा राजू शेट्टी, विशाल पाटील सतेज पाटील यांची उपस्थिती, पुढील आंदोलनाची दिशा ठरणार सांगली / प्रतिनिधी शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा, सांगली सह संपूर्ण कृष्णा वारणा काठ महापुरात बुडणार तो वाचविणे आदिसह अन्य मागण्यासाठी शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी बुधगांव येथे शक्तिपीठ बाधित शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शक्तिपीठ बाधित शेतकरी बचाव कृती समितीचे महेश खराडे, उमेश देशमुख, सतीश साखळकर यांनी केले आहे. या मेळाव्याला माजी खा राजू शेट्टी, खा विशाल पाटील, आ सतेज पाटील, माजी आ बचू कडू, किसान सभेचे अजित नवले आदी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय गिरीश फोंडे, ऍड गजेंद्र येळकर, शिवाजी मगदूम, सम्राट मोरे, गणेश घोडके, गणपतराव घाटूळ हेही उपस्थित राहणार आहेत हा मेळावा शुक्रवारी दुपारी बारा वाजता बुधगांव येथील इशिता मंगल कार्यालयात होणार आहे. मेळाव्या पूर्वी तिरंगा झळकतो आमच्या शिवारात, शक्तिपीठ नको आमच्या वावरात या ब्रीद वाक्यानुसार सकाळी जिल्ह्यात सर्वत्र बाधित शेतीत तिरंगा फडकवण्यात येणार आहे बुधगांव येथेही मेळाव्या पूर्वी झेंडावंदन करण्यात येईल त्यानंतर मेळाव्यास प्रारंभ होईल असे सांगून खराडे, देशमुख म्हणाले शक्तिपीठ महामार्गा ला सांगली जिल्ह्यातून प्रचंड विरोध आहे. जिल्ह्यात कुठेही शेतीची मोजणी होऊ दिलेली नाही अधिकाऱ्यांना पिटाळून लावण्यात आले आहे. मात्र तरीही सरकार हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करत आहे. या महामार्गा मुळे ऊस, द्राक्ष शेती उध्वस्त होणार आहेच मात्र सांगली, सांगलीवाडी, कर्नाळ, पद्माळे, आदिसह कृष्णा आणि वारणा काठावरील सर्व गावे पाण्याखाली जाणार आहेत. बुधगांव ते दानोळी असा सुमारे 15 किमी उड्डाण पूल सांगलीवाडी मार्गे होणार आहे. या पुलाचा 20 ते 25 फूट भराव असणार आहे त्यामुळे सांगली शहरासह सर्व गावांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे शेती वाचविन्या बरोबरच शहरे आणि गावे वाचविण्यासाठी हा संघर्ष सुरु आहे. या सर्व बाबींचा विचार राज्य सरकारने करावा आदीसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. या मेळाव्याचे नियोजन प्रवीण पाटील अधिक पाटील, विक्रम पाटील, मनोहर पाटील, प्रभाकर तोडकर, उमेश एडके, यशवंत हारूगडे, अरुण पाटील, धनाजी जाधव, दत्ता पाटील, संतोष देसाई, रवींद्र साळुंखे, सचिन मांगले, विकास पाटील, विष्णू पाटील, रघुनाथ पाटील, नितीन झांबरे, अनिल माळी, भाऊ खाडे,आदी करत आहेत तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खराडे, देशमुख, साखळकर यांनी केले आहे
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांचा आज बुधगावात मेळावा राजू शेट्टी, विशाल पाटील सतेज पाटील यांची उपस्थिती, पुढील आंदोलनाची दिशा ठरणार सांगली / प्रतिनिधी शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा, सांगली सह संपूर्ण कृष्णा वारणा काठ महापुरात बुडणार तो वाचविणे आदिसह अन्य मागण्यासाठी शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी बुधगांव येथे शक्तिपीठ बाधित शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शक्तिपीठ बाधित शेतकरी बचाव कृती समितीचे महेश खराडे, उमेश देशमुख, सतीश साखळकर यांनी केले आहे. या मेळाव्याला माजी खा राजू शेट्टी, खा विशाल पाटील, आ सतेज पाटील, माजी आ बचू कडू, किसान सभेचे अजित नवले आदी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय गिरीश फोंडे, ऍड गजेंद्र येळकर, शिवाजी मगदूम, सम्राट मोरे, गणेश घोडके, गणपतराव घाटूळ हेही उपस्थित राहणार आहेत हा मेळावा शुक्रवारी दुपारी बारा वाजता बुधगांव येथील इशिता मंगल कार्यालयात होणार आहे. मेळाव्या पूर्वी तिरंगा झळकतो आमच्या शिवारात, शक्तिपीठ नको आमच्या वावरात या ब्रीद वाक्यानुसार सकाळी जिल्ह्यात सर्वत्र बाधित शेतीत तिरंगा फडकवण्यात येणार आहे बुधगांव येथेही मेळाव्या पूर्वी झेंडावंदन करण्यात येईल त्यानंतर मेळाव्यास प्रारंभ होईल असे सांगून खराडे, देशमुख म्हणाले शक्तिपीठ महामार्गा ला सांगली जिल्ह्यातून प्रचंड विरोध आहे. जिल्ह्यात कुठेही शेतीची मोजणी होऊ दिलेली नाही अधिकाऱ्यांना पिटाळून लावण्यात आले आहे. मात्र तरीही सरकार हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करत आहे. या महामार्गा मुळे ऊस, द्राक्ष शेती उध्वस्त होणार आहेच मात्र सांगली, सांगलीवाडी, कर्नाळ, पद्माळे, आदिसह कृष्णा आणि वारणा काठावरील सर्व गावे पाण्याखाली जाणार आहेत. बुधगांव ते दानोळी असा सुमारे 15 किमी उड्डाण पूल सांगलीवाडी मार्गे होणार आहे. या पुलाचा 20 ते 25 फूट भराव असणार आहे त्यामुळे सांगली शहरासह सर्व गावांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे शेती वाचविन्या बरोबरच शहरे आणि गावे वाचविण्यासाठी हा संघर्ष सुरु आहे. या सर्व बाबींचा विचार राज्य सरकारने करावा आदीसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. या मेळाव्याचे नियोजन प्रवीण पाटील अधिक पाटील, विक्रम पाटील, मनोहर पाटील, प्रभाकर तोडकर, उमेश एडके, यशवंत हारूगडे, अरुण पाटील, धनाजी जाधव, दत्ता पाटील, संतोष देसाई, रवींद्र साळुंखे, सचिन मांगले, विकास पाटील, विष्णू पाटील, रघुनाथ पाटील, नितीन झांबरे, अनिल माळी, भाऊ खाडे,आदी करत आहेत तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खराडे, देशमुख, साखळकर यांनी केले आहे
आटपाडीच्या कचरा डेपोत पुन्हा एकदा भीषण आग
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विभागांचे जिल्हास्तरीय तालुका स्तरीय अधिकार्यांनी समन्वय अधिकारी म्हणून चोख जबाब दारी बजावली संपूर्ण भव्य उपक्रमाचे संनियंत्रण केले.
पालकमंत्री यांचे संकल्पनेतून साकारलेल्या "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी "या लोकोन्मुखी उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद.
जिद्द धैर्य आणि मेहनतीतून तरुण शेतकऱ्यांची जुगाड यंत्रणा पिकांच्या फवारणीत मंथन मडावी यांचे यश
रूठकर ट्रेन पकड़ने जा रहे प्यार के पैरों में गिरा प्रेमी, दृश्य देखकर मौके पर पहुंची पुलिस
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गडचिरोली यांचे आवाहन
अल्पवयीन मुलांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही झाली पाहिजे,मोहसीन खान
रेणापूर खरोळा मारहाण प्रकरण,पोलिस निरीक्षकांनी दिली माहिती
राज्यस्त कर्तव्यदक्ष पुरस्काराने प्रमोद गोविंद भगत यांचा सन्मान
आ. हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी शेडापार्क येथील बांधकामाची पाहणी केली.
Comments (0)
No comments yet. Be the first to comment!