Now Playing
आटपाडीत पूर्व रक्षाबंधनातून विश्वबंधुतेचा संदेश
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
Aug 27, 2026 11:16 PM
0
115
आटपाडीत पूर्व रक्षाबंधनातून विश्वबंधुतेचा संदेश
MAHARSHATRA - ATPADI
चामोर्शी तालुका पारंपारिक महाग्रामसभेची मासिक सभा उत्साहात संपन्न
MAHARSHATRA - CHAMORSHI
रेणापूर शहरात शासकीय रुग्णालयासमोर ट्रकने चौघांना चिरडले,दोघे ठार तर दोघे गंभीर जखमी
MAHARSHATRA - UDGIR
लाखोंचे कर्ज,टँकरने पाणी,टोमॅटोला कवडीमोल भाव,शेतकरी हताश
MAHARSHATRA - UDGIR
लखमापूर बोरी जि,प, उच्च,प्रा, केंद्र शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न
MAHARSHATRA - CHAMORSHI
वायगाव येथे कॉन्ट्रॅक्टरने गळफास घेऊन केली आत्महत्या
MAHARSHATRA - UDGIR
हंडरगुळी शिवारात शेतकऱ्यांची आत्महत्या,तिघांवर वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
MAHARSHATRA - UDGIR
रोजगार मेळावा
MAHARSHATRA - SANGLI
मंत्र्यांचे बंगले-गाड्या लिलाव आंदोलनापूर्वी तुपकरांसह शेतकऱ्यांची धरपकड
Breaking
MAHARSHATRA - MUMBAI
घोरपड प्राण्यांची शिकार करून विक्रीसाठी आणलेल्या घोरपडीची प्राणीमित्र आशिष कल्लूरे यांनी केली सुटका
MAHARSHATRA - UDGIR
अंध विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई करा व्ही एस पँथरचे कँडल मार्च
MAHARSHATRA - UDGIR
Full Story
आटपाडीत पूर्व रक्षाबंधनातून विश्वबंधुतेचा संदेश
अँकर इन :
आटपाडीमध्ये आज रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या केंद्रात विशेष पूर्व रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमातून जात, धर्म, पंथ आणि भेदभावाच्या पलीकडे जाऊन विश्वबंधुतेचा आणि प्रेम, शांती व सद्भावनेचा संदेश देण्यात आला.
व्हॉइस ओव्हर :
रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नव्हे, तर एकमेकांच्या रक्षणाची, प्रेमाची आणि विश्वासाची भावना जपणारा पवित्र संस्कार...
याच भावनेतून आटपाडी येथील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या केंद्रात पूर्व रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि विविध स्तरातील व्यक्तींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
यावेळी उपस्थित सर्वांना रक्षासूत्र बांधून परस्पर प्रेम, बंधुभाव, शांतता आणि विश्वबंधुतेचा संदेश देण्यात आला.
रक्षासूत्राच्या माध्यमातून केवळ व्यक्तीचे नव्हे, तर समाजातील मूल्यांचे, संस्कारांचे आणि मानवतेचे रक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला.
धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात माणसामाणसातील नातेसंबंध अधिक दृढ व्हावेत, समाजात शांतता आणि सद्भावना निर्माण व्हावी, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.
अँकर आऊट :
रक्षाबंधनाच्या निमित्ताने आटपाडीतून देण्यात आलेला हा विश्वबंधुतेचा संदेश निश्चितच समाजाला प्रेम, शांतता आणि एकतेची दिशा देणारा ठरला.
Comments (0)
No comments yet. Be the first to comment!