Now Playing
शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश पेढे वाटून व्यक्त केला आनंद
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश पेढे वाटून व्यक्त केला आनंद
"अवघ्या चार दिवसांत मंदिर चोरीचा पर्दाफाश; पाच आरोपींपैकी चार जेरबंद, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त."
सर्जरीचे औषध घेऊन डॉ मेहुल राठोड यांनी केली आत्महत्या,पोलीस उपअधीक्षक समरसिंह साळवे
"अवघ्या चार दिवसांत मंदिर चोरीचा पर्दाफाश; पाच आरोपींपैकी चार जेरबंद, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त."
पेटतळा येथे पोलीस स्टेशन घोटच्या पुढाकारातून भव्य कृषी मेळावा शेतकऱ्यांना विविध योजनासह महाविस्तार Alअपची माहिती
अंजली नगर भागात घराला लागलीआग,आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
लोकाभिमुख कार्यकर्ते तथा नगरसेवक नितीन वायलालवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
खासदार डॉ नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त गजानन मंदिर घारगाव येथे महिलांना नोटबुकचे वाटप
कचरा डेपोसाठी पर्यायी जागांचा विचार सुरू आहे नगराध्यक्ष यु टी जाधव
कचरा डेपोत लागलेल्या आगीच्या धुरामुळे परिसरातील नागरिक हैराण
Comments (1)
Ashok Pawar MD
14 Feb, 2024बेदाणा शालेय पोषण आहारात अध्यादेश ,स्वाभिमानीच्या लढ्याचे यश पेढे वाटून केला आनंदो उस्तव जिल्ह्यातील पावणे तीन लाख तर राज्यातील सव्वा कोटी विद्यार्थांना लाभ सांगली / प्रतिनिधी बेदान्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा अध्यादेश अखेर 12 फेब्रुवारी रोजी शासनाने काढला हे स्वाभिमानीच्या लढ्याचे यश आहे , आमच्या सात ते आठ वर्षे सुरू असलेल्या संघर्षाला यश मिळाले असल्याचा दावा करून या बेदाण्याची खरेदी व्यापाऱ्या कडून न करता थेट शेतकऱ्याच्या कडून करावी अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला दरम्यान या आनंदा प्रीत्यर्थ स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक मेकांना पेढे भरवून हा आनंद साजरा केला, लढेंगे जीतेंगे अशा घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला त्यानंतर जिल्हाधिकारी राजा दयानिधी,महापालिका आयुक्त सुनील पवार यांनाही पेढे भरवून शासनाचे आभार मानले यावेळी कार्यकर्त्या समोर बोलताना महेश खराडे म्हणाले जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 75 हजार तर राज्यातील सव्वा कोटी विद्यार्थांना याचा लाभ होणार आहे आठवड्या तून एकदा 50 ते 100 ग्रॅम बेदाणा दिला जाणार आहे 50 ग्रॅम बेदाणा दिला तरी एका आठवड्याला 5 लाख टन बेदाणा लागेल महिन्याला 20 लाख टन तर वर्षाला 200 लाख टन बेदाण्याची आवश्यकता आहे याचाच अर्थ उपलंभ बेदाणा कमी पडेल अशी शक्यता आहे मात्र या बेदाण्याची खरेदी व्यापाऱ्या कडून न करता थेट शेतकऱ्या कडून च केली पाहिजे अन्यथा आम्ही त्यासाठीही आंदोलन करू . बेदान्याचा शालेय पोषण आहारात समावेश करावा यासाठी संघटना गेली आठ ते नऊ वर्षे प्रयत्न करत आहे त्यासाठी गेल्या वर्षी पालक मंत्र्याच्या घरावर चड्डी मोर्चा काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर गळ्यात बेदाणा हार मोर्चा काढला बेदान्याचे मोफत वाटप करून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष्य वेधले त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी मुंबईला बोलावले त्यावेळी त्यांनी आश्वासन दिले होते त्यानंतर अधिवेशनात हा निर्णय घेतला त्याचा अध्यादेश 12 फेब्रुवारी रोजी काढून राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत हा मोठा निर्णय आहे आम्ही मुख्यमंत्री पालकमंत्र्यांचे आभार मानतो या वेळी संजय बेले संजय खोलखुंबे अजित हलीगले प्रकाश मिरजकर श्रीधर उदगावे बाळासाहेब भानुसे महेश संकपाल शातीनाथ लिंबेकाई सचिन वसगडे ऋषिकेश कणवाडे दीपक कनवाडे महावीर चौगुले दीपक मगदूम सागर बिरनार्ळ सुरेश पाचिबरे आदी उपस्थित होते