Now Playing
शेटफळेत शक्तिपीठ मार्गाला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध पोलीस बंदोबस्तातील मोजणी पाडली बंद
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
Jun 26, 2025 12:44 AM
1
57
शेटफळेत शक्तिपीठ मार्गाला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध पोलीस बंदोबस्तातील मोजणी पाडली बंद
MAHARSHATRA - ATPADI
आटपाडीत हिंदू-मुस्लिम सामाजिक एकतेचं दर्शन
MAHARSHATRA - ATPADI
महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करताना
MAHARSHATRA - ATPADI
शिवस्फारकासाठी आटपाडी मध्ये बंद आंदोलकांकडून घोषणाबाजी
MAHARSHATRA - ATPADI
शिवस्मारकाच्या साठी आटपाडीकरांचा कडकडीत बंद आटपाडीकरांच्या प्रतिसाद उस्फूर्त महेश कुमार पाटील
MAHARSHATRA - ATPADI
चामोर्शी तालुका पारंपारिक महाग्रामसभेची मासिक सभा उत्साहात संपन्न
MAHARSHATRA - CHAMORSHI
रेणापूर शहरात शासकीय रुग्णालयासमोर ट्रकने चौघांना चिरडले,दोघे ठार तर दोघे गंभीर जखमी
MAHARSHATRA - UDGIR
लाखोंचे कर्ज,टँकरने पाणी,टोमॅटोला कवडीमोल भाव,शेतकरी हताश
MAHARSHATRA - UDGIR
लखमापूर बोरी जि,प, उच्च,प्रा, केंद्र शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न
MAHARSHATRA - CHAMORSHI
वायगाव येथे कॉन्ट्रॅक्टरने गळफास घेऊन केली आत्महत्या
MAHARSHATRA - UDGIR
हंडरगुळी शिवारात शेतकऱ्यांची आत्महत्या,तिघांवर वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
MAHARSHATRA - UDGIR
Comments (1)
Ashok Pawar MD
26 Jun, 2025शेटफळेत शक्तीपीठ मार्गाला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध पोलीस बंदोबस्ता तील मोजणी पाडली बंद राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणारा मार्ग सांगली जिल्ह्यातील शेटफळे गावातून जात आहे सदर मार्गाच्या मोजणीसाठी दुसऱ्यांदा बंदोबस्तात मोजणी पथक दाखल झालं होतं मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांनी या मार्गाला जोरदार विरोध केला तरी सुद्धा प्रशासनाने मोजणी करण्याचा चंग बांधला होता तेव्हा शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने जमिनीवर झोपून विरोध केला व मोजणीसाठी आलेल्या पथकाला त्यांचे मोजणीसाठी लावले जाणारे स्टॅन्ड सुद्धा उभा करू दिले नाही मोजणीचा डाव शेतकऱ्यांनी उधळून लावल्यानंतर प्रशासनाने दुसऱ्या मार्गाने मोजणी करण्याचा प्रयत्न केला परंतु तेथेही शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर मोजणी बंद करण्यात आली परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून मार्ग जाणार आहे त्या शेतकऱ्या ंची आम्ही चर्चा करणार आहोत असे म्हणून प्रशासन संध्याकाळी उशिरापर्यंत शेतामधून घिरट्या घालत होते शेटफळे गावाच्या हद्दीतून जवळपास चार ते पाच किलोमीटर एवढा मार्ग जात आहे या मार्गामध्ये 400 हून जास्त शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे या गावाच्या हद्दीतील 39 हेक्टर एवढी जमीन ह्या मार्गामध्ये जात आहे शेटफळे परिसर हा दुष्काळी आहे या भागामध्ये पाण्याचे दुर्भ्यक्ष होतं म्हणूनच 1991 पासून या भागातून टेंभू योजनेचे पाणी मिळावं म्हणून चळवळ सुरू झाली आता कुठे या भागामध्ये टेंभूचे पाणी पोहोचलेल आहे परंतु या भागांमध्ये पाणी पोहोचलं आणि शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे आम्ही शेतकऱ्यांना समजवलेला आहे व आम्ही जे शेतकरी जमीन देण्यास तयार आहेत त्यांच्या जमिनीमध्ये मोजणी चालू ठेवलेले आहे एका बाजूला या संपूर्ण महामार्गाला शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध आहे शिवाय याच महामार्गाला समांतर असा दुसरा नागपूर रत्नागिरी हा महामार्ग आहे व तो महामार्ग ही पूर्ण क्षमतेने चालू नाही अशा स्थितीमध्ये नवीन महामार्ग निर्माण करण्याची काय गरज असा संपूर्ण महाराष्ट्रातून सवाल उपस्थित केला जात आहे परंतु प्रशासन मात्र फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षेपोटी खाजगी एजंटासारखी भूमिका घेऊन शेतकऱ्यांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत प्रशासनाकडून शेतकऱ्यांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला जात आहे जे शेतकरी मोजणीस विरोध करणार नाही त्यांना पाचपट मोबदला देऊ जे विरोध करतील त्यांना चार पट मोबदला मिळेल असं अमिष दाखवून शेतकऱ्यांमध्ये इंग्रजाप्रमाणे फूट पाडून भूसंपादन करण्याचा डाव टाकलेला आहे