मागील जवळपास चार-पाच महिन्यापासून मुंबई येथे समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक होत आहे ते स्मारक सध्या अर्धवट अवस्थेमध्ये आहे ते स्मारक पूर्ण व्हावे या मागणीसाठी आटपाडी मध्ये इंजिनियर महेश कुमार पाटील यांच्याकडून निवेदने आंदोलन धरणे आंदोलन आमरण उपोषण आंदोलन आणि आता बंदची हाक अशी एकामागून एक आंदोलन केली जात आहे याच अनुषंगाने 31 ऑक्टोबर रोजी शिवस्मारकाच्या पूर्ततेसाठी आंदोलन ची हाक दिली होती या हाकेला आटपाडीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संपूर्ण व्यवहार बंद ठेवून बंद पाळला या बंद कडे पाहता जनतेच्या भावना किती तीव्र आहेत हे लक्षात येतं