Now Playing
"आटपाडीचं प्रतीक शिल्प की नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचं शिल्प?"
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
"आटपाडीचं प्रतीक शिल्प की नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचं शिल्प?"
अल्पवयीन मुलांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही झाली पाहिजे,मोहसीन खान
रेणापूर खरोळा मारहाण प्रकरण,पोलिस निरीक्षकांनी दिली माहिती
राज्यस्त कर्तव्यदक्ष पुरस्काराने प्रमोद गोविंद भगत यांचा सन्मान
आ. हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी शेडापार्क येथील बांधकामाची पाहणी केली.
भेंडाळा येथील अल्का सातपुते यांची कृषी ड्रोन प्रशिक्षणासाठी निवड महिलांच्या जिद्दीस मिळाले यश
मुख्य आरोपी किशोर महाराज शिवणीकर अटक,प्रकरणात कोण कोण व्यक्ती त्यांची नावे समोर येतील,पोलीस निरीक्षक चवरे
कोल्हापूर शहर DYSP ॲक्शन मोडवर शहरातील 160 गुन्हेगा रांची ओळख परेड करून त्यांचे माहितीचे आदान- प्रदान केले.
खरसुंडी सिद्धनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील अष्टकोनी खांबावर चांदीचे नक्षीकाम
रेणापूर तालुक्यातील खरोळा गावात बोअरच्या केबलची चोरी करणाऱ्या मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण
अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंक्स किंवा APK फाईल्स डाउनलोड करू नका; त्यामुळे फोन हॅक होऊन फसवणुकीचा धोका वाढतो.मुख्यमंत्री
Comments (1)
Ashok Pawar MD
25 Sep, 2025"आटपाडीचं प्रतीक शिल्प… जे शहराची शान, ओळख आणि अभिमान ठरलं होतं. डाळिंब आणि मेंढीचं हे शिल्प म्हणजे आटपाडीच्या संस्कृतीचं प्रतीक! पण नगरपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे आज तेच शिल्प दुर्लक्ष आणि अधःपतनाचं प्रतीक बनलं आहे…" --- "अण्णाभाऊ साठे चौकातील कोपऱ्यावर उभारलेलं ‘आपली आटपाडी’ शिल्प… या शिल्पाभोवती कारंजं, हिरवळ, रंगीबेरंगी लाइट्स अशी लाखो रुपयांची सजावट केली गेली होती. नागरिक येथे येऊन अभिमानाने फोटो काढतात, आटपाडीचं नाव जगभर पोहोचवत होते. पण आज? या ठिकाणी कारंज्यातलं पाणी अक्षरशः काळं झालं आहे… पाण्यात आळ्या उठलेल्या आहेत… आणि मच्छरांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे." --- "शहराच्या मध्यवर्ती चौकात, पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयाच्या शेजारी हा रोगट वातावरण तयार झालंय. नागरिक जेथे आनंदाने यायचे, फोटो काढायचे… तेच आता डेंग्यू-चिकनगुनियाचं संभाव्य केंद्र बनलंय." --- "नगरपंचायतीला वारंवार तक्रारी करूनही मुख्य अधिकारी कानावर घेत नाहीत. कालच जिल्हाधिकारी आटपाडीत होते. नागरिकांनी स्वतः कलेक्टरांपुढे नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचा पाढा वाचला. पण मुख्य अधिकारी एवढे बेफिकीर की… कलेक्टरांशी देखील भेट घेतली नाही! अधिकारी गायब झाले. आता प्रश्न असा… हे अधिकारी खरंच जनतेसाठी काम करतात की कोणाच्या तरी वरदहस्ताने?" --- Anchor "आटपाडीचं प्रतीक शिल्प हे शहराच्या ओळखीचं दार आहे… आणि त्याची अशी दुर्दशा करणाऱ्या नगरपंचायतीला नागरिकांचा संताप आता प्रचंड आहे. प्रशासनाने तात्काळ पावलं उचलली नाहीत… तर नागरिक रस्त्यावर उतरतील, हे निश्चित आहे!"