Search

Now Playing

पदवी मिळाली म्हणजे शिक्षण पुर्ण झाले असे नाही आता खऱ्या जिवणाची सुरवात आहे प्राचार्य डॉ योगेश पाटिल

Download

Comments (1)

shrimant surpam
shrimant surpam
08 Apr, 2026

महिला महाविद्यालय गडचिरोली येथे पदवी वितरण समारंभ श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, द्वारा संचालित महिला महाविद्यालय, गडचिरोली येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोज मंगळवारला पदवी वितरण समारंभ २०२४-२०२५ तसेच माजी विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता शैक्षणिक सत्र २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात B.A, B.Lib, M.Lib, MA पदवी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. या निमित्ताने मंचावर अध्यक्ष म्हणून महिला महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. योगेश पाटील, प्रमुख अतिथी म्हणून संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तथा प्राचार्य एस चंद्रा महाविद्यालय, आष्टी च्या डॉ. अनिता लोखंडे तसेच कार्यक्रम समन्वक तसेच सहयोगी प्राध्यापक तथा इतिहास विभाग प्रमुख डॉ. प्रमोद बोधाने , राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख तसेच अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कुंदन दुफारे,इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा त्रिपाठी उपस्थित होते. उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः । न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः ॥ ‘शिक्षण हे केवळ पदवी मिळळविण्याचे साधन नसून, ते आयुष्य घडविण्याची प्रक्रिया आहे’ खरे शिक्षण तेच जे समाजात सकारात्मक बदल घडविते‘ कोणतीही कार्ये परिश्रमानेच सिद्ध होतात, केवळ इच्छेने नाही. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण स्वतःहून प्रवेश करत नाही, त्यालाही शिकार करावीच लागते. उच्चशिक्षण संस्था किंवा विद्यापीठाद्वारे आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र दिले जाते.या समारंभात विद्यार्थी पारंपारिक किंवा विशेष गणवेश (गाऊन आणि टोपी) परिधान करतात, जे या दिवसाचे गांभीर्य दर्शवते.हे केवळ कागदपत्र मिळवणे नसून, वर्षभराच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे, जो विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी भावनिक असतो. महाविद्यालयीन शिक्षणाचा टप्पा भावी आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य देतो. पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यावर अनेकदा 'पदवीप्रदान' हा शब्द अधिक योग्य मानला जातो, कारण पदवी ही दानात न मिळता ती प्रयत्नांचे फळ असते. ‘ विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत मूल्यांचे पालन करुन समाजघडविण्यास हातभार लावावा’ अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांनी आपले विचार प्रकट केले. पदवीदान समारंभ हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानास्पद सोहळा आहे, जिथे अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांना अधिकृतपणे पदवी प्रदान केली जाते। हा सोहळा यश साजरा करण्याचा, स्मृती जपण्याचा आणि पुढील वाटचालीस प्रेरणा देणारा टप्पा असतो. असे प्रास्ताविक करताना डॉ. प्रमोद बोधाने यांनी माहिती दिली. पदवी ग्रहण करतांना तो केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे हा हेतू जरी असला तरी महाविद्यालयाच्या चार भिंतीतून विद्यार्थी असंख्य अनुभव घेऊन बाहेर पडतात.कोरोनानंतरचा काळ हा बरच काही शिकवून गेला आणि म्हणून विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळले आणि पदवी ही केवळ कागदावर हवी अशी विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती झाली. परंतु पदवी पर्यंत पोहचत असतांना अनुभवांची जी शिदोरी प्राध्यापकांकडून मिळते ते प्रत्यक्ष मिळालेलं ज्ञान इतर कुठेही मिळणार नाही.असे विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस प्रेरणा देतांना डॉ. अनिता लोखंडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. या पदवीप्रदान समारंभाला उपस्थित असलेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आपले अनुभव प्रकट केले. या पदवी वितरण समारंभ, माजी विद्यार्थी व पालक मेळाव्याचे संचालन कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद बोधाने यांनी केले तर आभार इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा त्रिपाठी यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. कुंदन दुफारे, डॉ. अनिल चहांदे, डॉ. प्रज्ञा त्रिपाठी, प्रा.सुनीता साळवे, प्रा.वीणा तुंबडे, प्रा. विलास पारखी, प्रा. ज्ञानेश्वर धकाते, प्रा.डॉ. ज्योत्स्ना राऊत, प्रा. गायत्री गुरव, प्रा. दर्शना खेवले, प्रा. कीर्ती पुल्लकवार, प्रा.स्वाती आदे, प्रा.मारुती वाघधरे, प्रा. विवेक येमजेलवार, प्रा. साईनाथ कोडजावरे, श्रीमती लता वाईलकर, श्री. मधुकर धानोरकर आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनी तसेच माजी विद्यार्थीनी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get More News

Download our app for more breaking news and updates

Download App
Download NM News App Stay updated with the latest news on the go! Experience NM News on your mobile device. Download App