Now Playing
लोकनेता अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते महर्षि वाल्मिकी यांच्या मुर्तीची अमिर्झा येथे प्रतिष्ठापना
shrimant surpam
(MAHARSHATRA, GADCHIROLI)
Apr 08, 2026 06:06 PM
1
297
लोकनेता अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते महर्षि वाल्मिकी यांच्या मुर्तीची अमिर्झा येथे प्रतिष्ठापना
MAHARSHATRA - GADCHIROLI
शिवस्फारकासाठी आटपाडी मध्ये बंद आंदोलकांकडून घोषणाबाजी
MAHARSHATRA - ATPADI
शिवस्मारकाच्या साठी आटपाडीकरांचा कडकडीत बंद आटपाडीकरांच्या प्रतिसाद उस्फूर्त महेश कुमार पाटील
MAHARSHATRA - ATPADI
चामोर्शी तालुका पारंपारिक महाग्रामसभेची मासिक सभा उत्साहात संपन्न
MAHARSHATRA - CHAMORSHI
रेणापूर शहरात शासकीय रुग्णालयासमोर ट्रकने चौघांना चिरडले,दोघे ठार तर दोघे गंभीर जखमी
MAHARSHATRA - UDGIR
लाखोंचे कर्ज,टँकरने पाणी,टोमॅटोला कवडीमोल भाव,शेतकरी हताश
MAHARSHATRA - UDGIR
लखमापूर बोरी जि,प, उच्च,प्रा, केंद्र शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न
MAHARSHATRA - CHAMORSHI
वायगाव येथे कॉन्ट्रॅक्टरने गळफास घेऊन केली आत्महत्या
MAHARSHATRA - UDGIR
हंडरगुळी शिवारात शेतकऱ्यांची आत्महत्या,तिघांवर वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
MAHARSHATRA - UDGIR
रोजगार मेळावा
MAHARSHATRA - SANGLI
आटपाडीत पूर्व रक्षाबंधनातून विश्वबंधुतेचा संदेश
MAHARSHATRA - ATPADI
Comments (1)
shrimant surpam
08 Apr, 2026अमिर्झा येथे महर्षी वाल्मीकी ऋषी मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना; समाज एकतेचे दर्शन घडावे – अरविंदभाऊ कात्रटवार अमिर्झा (ता. गडचिरोली) येथे ढिवर भोई समाजाच्या वतीने उभारण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी ऋषी मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना हनुमान जयंती निमित्त भक्तिमय वातावरणात पार पडली. या सोहळ्यात मौशिखांब–मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राचे लोकनेते अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. समाजाच्या एकतेचा आणि सांस्कृतिक जतनाचा संदेश देणारा हा सोहळा सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी मंगलमय झाला. समाज एकतेचे प्रतीक बनावे – अरविंदभाऊ कात्रटवार या प्रसंगी बोलताना अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले की, “सेवाभावातून केलेल्या कार्यामुळे आत्मिक समाधान मिळते. ढिवर भोई समाजाने महर्षी वाल्मिकी ऋषी मंदिर उभारण्याचा घेतलेला निर्णय हा समाजातील एकजूट आणि समर्पणाचे प्रतीक आहे. हे मंदिर केवळ श्रद्धास्थान नव्हे, तर समाज एकतेचे दर्शन घडवेल.” ते पुढे म्हणाले की भोई समाजातील अनेक समस्या अद्याप प्रलंबित आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजापर्यंत पोहोचलेला नाही. समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे असून या समस्यांच्या निवारणासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. रामायणाचे आदर्श जीवनमूल्य समाजापर्यंत – कात्रटवार अरविंदभाऊ म्हणाले, “महर्षी वाल्मिकी ऋषी हे रामायणाचे रचनाकार असून या महाकाव्यातून सत्य, कर्तव्य, साहस व आदर्श यांचे मार्गदर्शन मिळते. हे मंदिर समाजाला आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देईल.” विविध मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला अरविंदभाऊ मित्रपरिवार व गावातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. त्यामध्ये यादवजी लोहंबरे, गोपाल मोंगरकर, यादव चौधरी, विनोद चापले, दीपक लाडे, स्वप्नील जुमनाके, अमित चौधरी, प्रकाश भजबुजे, अमित हुलके, सुरेश वाघाडे, अमर सोरते, प्रशांत ठाकूर, देवेंद्र मुळे, गणेश ठाकरे, कैलास लाडे, दीपक राऊत, रोशन कोरते, विश्वनाथ भानारकर, जगदीश खेवले, कवडू खेडेकर, आशिष निकुरे, अमोल मेश्राम, मयुर मेश्राम, किशोर म्हशाखेत्री, मोहन ठाकरे, नवनीत मेश्राम, विलास नैताम, दीपक वलादे, जीवन कुरुडकर आणि गावकरी उपस्थित होते.