Now Playing
लोकनेता अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते महर्षि वाल्मिकी यांच्या मुर्तीची अमिर्झा येथे प्रतिष्ठापना
shrimant surpam
(MAHARSHATRA, GADCHIROLI)
लोकनेता अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते महर्षि वाल्मिकी यांच्या मुर्तीची अमिर्झा येथे प्रतिष्ठापना
ଋତୁକାଳୀନ ଫଳ ଓ ପରିବା ଚାଷ ଏ ମାନ ଙ୍କୁ ଦେଇଛି ନୂଆ ଜୀବନ ।
MANT-कोसीकला में तालाब में मिला राजमिस्त्री का शव, मानसिक हालत खराब होने की बात, आई सामने,,
MANT-शिहन तोमर ने पावर लिफ्टिंग में जीता स्वर्ण,राष्ट्रीय चैंपियन शिप के लिए क्वालीफाई,,
मागोर्रा थाना क्षेत्र में नहर किनारे मिला अज्ञात महिला का शव फैली सनसनी लोगों ने हत्या की आशंका जताई
राजकीय महाविद्यालय गोवर्धन के वार्षिक उत्सव व सांस्कृतिक समारोह में क्या हुआ
बाघराय थानाक्षेत्र के सीएचसी बाघराय में एंटी करप्शन की बड़ी कार्रवाई,बीपीएम अमित मिश्रा 50हजार रिश्वत लेते गिरफ्तार,
➡️....मेरठ में BJP नेताओं/व्यापारियों के दबाव में तत्कालीन कमिश्नर ऋषिकेश भास्कर ने सेंट्रल मार्केट ध्वस्तीकरण रोकने का आदेश जारी
भदरिया पुरातात्विक स्थल को मिलेगी नई पहचान।विधायक जयंत राज की पहल के बाद डीएम का निरीक्षण,जगी विकास की उम्मीद।
एक दिन की डीएम
शाहजहांपुर में एक घंटे झमाझम बारिश, अब भी हल्की बूंदाबांदी जारी
Comments (1)
shrimant surpam
08 Apr, 2026अमिर्झा येथे महर्षी वाल्मीकी ऋषी मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना; समाज एकतेचे दर्शन घडावे – अरविंदभाऊ कात्रटवार अमिर्झा (ता. गडचिरोली) येथे ढिवर भोई समाजाच्या वतीने उभारण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी ऋषी मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना हनुमान जयंती निमित्त भक्तिमय वातावरणात पार पडली. या सोहळ्यात मौशिखांब–मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राचे लोकनेते अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. समाजाच्या एकतेचा आणि सांस्कृतिक जतनाचा संदेश देणारा हा सोहळा सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी मंगलमय झाला. समाज एकतेचे प्रतीक बनावे – अरविंदभाऊ कात्रटवार या प्रसंगी बोलताना अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले की, “सेवाभावातून केलेल्या कार्यामुळे आत्मिक समाधान मिळते. ढिवर भोई समाजाने महर्षी वाल्मिकी ऋषी मंदिर उभारण्याचा घेतलेला निर्णय हा समाजातील एकजूट आणि समर्पणाचे प्रतीक आहे. हे मंदिर केवळ श्रद्धास्थान नव्हे, तर समाज एकतेचे दर्शन घडवेल.” ते पुढे म्हणाले की भोई समाजातील अनेक समस्या अद्याप प्रलंबित आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजापर्यंत पोहोचलेला नाही. समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे असून या समस्यांच्या निवारणासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. रामायणाचे आदर्श जीवनमूल्य समाजापर्यंत – कात्रटवार अरविंदभाऊ म्हणाले, “महर्षी वाल्मिकी ऋषी हे रामायणाचे रचनाकार असून या महाकाव्यातून सत्य, कर्तव्य, साहस व आदर्श यांचे मार्गदर्शन मिळते. हे मंदिर समाजाला आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देईल.” विविध मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला अरविंदभाऊ मित्रपरिवार व गावातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. त्यामध्ये यादवजी लोहंबरे, गोपाल मोंगरकर, यादव चौधरी, विनोद चापले, दीपक लाडे, स्वप्नील जुमनाके, अमित चौधरी, प्रकाश भजबुजे, अमित हुलके, सुरेश वाघाडे, अमर सोरते, प्रशांत ठाकूर, देवेंद्र मुळे, गणेश ठाकरे, कैलास लाडे, दीपक राऊत, रोशन कोरते, विश्वनाथ भानारकर, जगदीश खेवले, कवडू खेडेकर, आशिष निकुरे, अमोल मेश्राम, मयुर मेश्राम, किशोर म्हशाखेत्री, मोहन ठाकरे, नवनीत मेश्राम, विलास नैताम, दीपक वलादे, जीवन कुरुडकर आणि गावकरी उपस्थित होते.