Now Playing
रविकांत तुपकर पोहचले पूरग्रस्तांच्या बांधावर
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, BULDHANA)
Aug 05, 2026 06:56 PM
0
126
रविकांत तुपकर पोहचले पूरग्रस्तांच्या बांधावर
MAHARSHATRA - JALGAON JAMOD
चामोर्शी तालुका पारंपारिक महाग्रामसभेची मासिक सभा उत्साहात संपन्न
MAHARSHATRA - CHAMORSHI
रेणापूर शहरात शासकीय रुग्णालयासमोर ट्रकने चौघांना चिरडले,दोघे ठार तर दोघे गंभीर जखमी
MAHARSHATRA - UDGIR
लाखोंचे कर्ज,टँकरने पाणी,टोमॅटोला कवडीमोल भाव,शेतकरी हताश
MAHARSHATRA - UDGIR
लखमापूर बोरी जि,प, उच्च,प्रा, केंद्र शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न
MAHARSHATRA - CHAMORSHI
वायगाव येथे कॉन्ट्रॅक्टरने गळफास घेऊन केली आत्महत्या
MAHARSHATRA - UDGIR
हंडरगुळी शिवारात शेतकऱ्यांची आत्महत्या,तिघांवर वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
MAHARSHATRA - UDGIR
रोजगार मेळावा
MAHARSHATRA - SANGLI
आटपाडीत पूर्व रक्षाबंधनातून विश्वबंधुतेचा संदेश
MAHARSHATRA - ATPADI
मंत्र्यांचे बंगले-गाड्या लिलाव आंदोलनापूर्वी तुपकरांसह शेतकऱ्यांची धरपकड
Breaking
MAHARSHATRA - MUMBAI
घोरपड प्राण्यांची शिकार करून विक्रीसाठी आणलेल्या घोरपडीची प्राणीमित्र आशिष कल्लूरे यांनी केली सुटका
MAHARSHATRA - UDGIR
Full Story
" रविकांत तुपकर पोहचले पूरग्रस्तांच्या बांधावर ! जळगाव जामोद तालुक्यात केला १५ गावांचा दौरा,महसूल यंत्रणेला खडसावले; 'नुकसान कमी दाखवण्याचे आदेश कुणाचे? आठवड्यात १०० टक्के मदत द्या, अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू...तुपकरांचा कडक इशारा.! नद्यांचे खोलीकरण युद्धपातळीवर करा, जिल्हाधिकारी व तहसीलदारांशी तुपकरांची चर्चा
जळगाव जामोद (प्रतिनिधी): ३१ जुलैच्या मध्यरात्री जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यावर कोसळलेल्या २५५ मिमी विक्राळ पावसाने संपूर्ण तालुक्याला अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकले. शेकडो शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली, हजारो एकरांवरील सुपीक माती खरडून गेली, तर अनेक ठिकाणी शेतीच अस्तित्वहीन झाली आहे. या भीषण परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुधवारी गावागावांत जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर धडक दिली. शेतकऱ्यांच्या बांधावरील झालेले नुकसान, प्रत्यक्ष पंचनाम्यातील तफावत यावरून तुपकर संतापले आणि महसूल व कृषी यंत्रणेसह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.यावेळी तुपकरांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचेशी सविस्तर चर्चा करून आंदोलनाचा इशारा दिला.
भेंडवळ खु , भेंडवळ बु, चावरा, ईलोरा, मडाखेड खु, पळसखेड,येनगाव, वडशिंगी, उटी खु, उटी बु, निंभोरा बु, खेर्डा बु,सातळी,जळगाव शहर व जळगाव जामोद तालुक्यातील अनेक गावांमध्ये तुपकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. अनेक ठिकाणी शेतजमीन तब्बल चार ते पाच फूट खोलपर्यंत खरडून गेल्याचे, तर काही ठिकाणी विहिरी वाहून गेल्या, अनेक विहिरी खचल्या, शेतातील बांध फुटले आणि शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे भयावह चित्र त्यांच्या समोर आले. अनेक शेतकरी हताश अवस्थेत दिसून आले.
*"हे पंचनामे आहेत की शेतकऱ्यांची थट्टा?"*
पूरग्रस्त भागातील पंचनाम्यांवर संताप व्यक्त करत तुपकर यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला. "जिथे शंभर टक्के नुकसान झाले आहे, तिथे पंचनाम्यात ३० ते ४० टक्के नुकसान दाखवले जात आहे. तुम्हाला नुकसान कमी दाखवण्याचे आदेश कुणी दिले? शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासाठीच ही यंत्रणा काम करत आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी केला. "पंचनाम्यांच्या नावाखाली वेळकाढूपणा आणि आकडेवारीचा खेळ बंद करा. शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवायला
Comments (0)
No comments yet. Be the first to comment!