Now Playing
आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन एसओपी,सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची घोषणा;
shrimant surpam
(MAHARSHATRA, GADCHIROLI)
Aug 10, 2026 09:23 PM
0
282
आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन एसओपी,सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची घोषणा;
MAHARSHATRA - GADCHIROLI
चामोर्शी तालुका पारंपारिक महाग्रामसभेची मासिक सभा उत्साहात संपन्न
MAHARSHATRA - CHAMORSHI
रेणापूर शहरात शासकीय रुग्णालयासमोर ट्रकने चौघांना चिरडले,दोघे ठार तर दोघे गंभीर जखमी
MAHARSHATRA - UDGIR
लाखोंचे कर्ज,टँकरने पाणी,टोमॅटोला कवडीमोल भाव,शेतकरी हताश
MAHARSHATRA - UDGIR
लखमापूर बोरी जि,प, उच्च,प्रा, केंद्र शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न
MAHARSHATRA - CHAMORSHI
वायगाव येथे कॉन्ट्रॅक्टरने गळफास घेऊन केली आत्महत्या
MAHARSHATRA - UDGIR
हंडरगुळी शिवारात शेतकऱ्यांची आत्महत्या,तिघांवर वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
MAHARSHATRA - UDGIR
रोजगार मेळावा
MAHARSHATRA - SANGLI
आटपाडीत पूर्व रक्षाबंधनातून विश्वबंधुतेचा संदेश
MAHARSHATRA - ATPADI
मंत्र्यांचे बंगले-गाड्या लिलाव आंदोलनापूर्वी तुपकरांसह शेतकऱ्यांची धरपकड
Breaking
MAHARSHATRA - MUMBAI
घोरपड प्राण्यांची शिकार करून विक्रीसाठी आणलेल्या घोरपडीची प्राणीमित्र आशिष कल्लूरे यांनी केली सुटका
MAHARSHATRA - UDGIR
Full Story
आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन एसओपी
सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची घोषणा; १४ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
गडचिरोली, ता. १० : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले. तसेच त्यांनी आश्रमशाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आता नवीन ‘एसओपी’ (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) निश्चित करण्यात येणार असल्याची घोषणा ॲड. जयस्वाल यांनी केली. येत्या १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात येईल. या बैठकीत विविध समित्यांचे कामकाज, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नवीन एसओपी तयार केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
जपतलाई आश्रमशाळेच्या वसतिगृहात रात्री सर्पदंश झाल्यानंतर तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून, गंभीर प्रकृती असलेल्या दीपिका मडावी हिला प्रशासनाने एअरलिफ्ट करून पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, शिवसेना नेते सुरेंद्रसिंह चंदेल, छाया कुंभारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांची मदत प्रस्तावित
मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात येणार असून, त्यापैकी एक लाख रुपयांची तत्काळ मदत देण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी अतिरिक्त पाच लाख रुपयांची मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक कुटुंबाला एकूण १० लाख रुपयांची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. याशिवाय इतर शासकीय योजनांमधूनही आवश्यक आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.
Comments (0)
No comments yet. Be the first to comment!